Marathi News> विश्व
Advertisement

पाकिस्तान दहशतवादी बनवण्याची फॅक्टरी, भारताने ठणकावले

भारताची पाकिस्तानवर कठोर शब्दात टीका. 

पाकिस्तान दहशतवादी बनवण्याची फॅक्टरी, भारताने ठणकावले

fallbacks

लंडन : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानवर कठोर शब्दात टीका केली. पाकिस्तान हा दहशतवादी बनवण्याची फॅक्टरी झाली असून ही फॅक्टरी पाकिस्तान सरकारच चालवत असल्याचं एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. आणि पाकिस्तानच्या या दहशतवादी उद्योगाचा भारताला मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. लंडनमधील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. 

पाकिस्तानच्या दहशतवादी उद्योगामुळे भारतासह अन्य देशांनाही त्रास होत आहे. भारत आता याचे सडेतोड उत्तर देईल, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सुनावले आहे. भारताने पाकिस्तानला मोस्ट फेव्हर्ड नेशनचाही दर्जा दिला होता. मात्र पाकिस्तानला त्यांच्या दहशतवादी उद्योगामुळे त्याचा फायदा घेता आला नाही. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया भारतासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरते. गेली अनेक वर्षे त्याच्याशी संघर्ष सुरु आहे. दहशतवादाच्या मुद्यावर भारताला जगाची साथ हवी आहे. तरच पाकिस्तानवर दबाव येऊ शकेल, असे जयशंकर यांनी म्हटले आहे.

Read More