Marathi News> विश्व
Advertisement

ladakh Clash : रात्री झालेल्या हिंसक झडपेत काही सैनिक नदी, खोऱ्यात पडून शहीद

 गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा हिंसक झडप झाली.  

ladakh Clash : रात्री झालेल्या हिंसक झडपेत काही सैनिक नदी, खोऱ्यात पडून शहीद

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा हिंसक झडप झाली. त्यावेळी एक नवीन घटना समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गलवान खोऱ्यात रात्री हिंसक झडप झाली. यावेळी काही सैनिक नदी तसेच दरीत कोसळून शहीद झालेत. चीनी सैन्य पूर्ण तयारीत आले होते. त्यांच्यासोबत लोखंडाचे रॉड आणि काही तोडलेल्या काटेरी तारा होत्या. 

कालच्या झडपेत भारताचे जवळपास २० सैनिक शहीद झाले आहेत तसेच चीनचेही मोठे नुकसान झाले आहे. भारताचे जे सैनिक शहीद झाले त्यात कर्नल रँकचे अधिकारीऱ्यांचा समावेश आहे. तर चीनचे ४३ जवान दुर्घटनाग्रस्त झाले आहेत. यात गंभीर जखमी झालेले आणि मरण पावलेल्यांची संख्या आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चीनकडून दुर्घटनाग्रस्तांची संख्या जाहीर होऊ शकते. चीनकडून चर्चा करण्याबाबत इंटरसेप्ट करण्यात आले आहे. याच आधारावर हा दावा करण्यात आला आहे.

भारतीय सैन्य देखील अधिकृत माहितीनुसार खातरजमा करत २० जवान शहीद झाल्याचे सांगत आहे. याआधी मिळालेल्या माहितीनुसार एक अधिकारीसह तीन जवान शहीद झाले आहेत. भारतीय सैन्याकडून सांगण्यात आले १७ जवान गंभीर जखमी होते. हे जवान शहीद झाले आहेत.

त्यानंतर लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीन यांच्यात झडप झाली. झडपनंतर चीनच्या हेलीकॉप्टरनी नियंत्रण रेषा पार केली. सूत्रांनी हवामान सांगितले की या घटनेनंतर चीनी हेलीकॉप्‍टरची संख्या दिसून आली. एवढे मोठी संख्या दिसून आल्याने चीन सैनिक मारले गेलेल्या जवानांना नेण्यासाठी तयारी करत असल्याचे दिसत आहे. 

Read More