Marathi News> विश्व
Advertisement

भारत या 2 देशांच्या जवळ आल्याने पाकिस्तान आणि चीनची उडाली झोप

पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा

भारत या 2 देशांच्या जवळ आल्याने पाकिस्तान आणि चीनची उडाली झोप

नवी दिल्ली : भारताची जगभरात शक्ती दररोज वाढत आहे. पाकिस्तान आणि चीन यामुळे भारताच्या वाढत्या सामर्थ्याने प्रचंड त्रस्त आहे. मुस्लीम देशांच्या सामर्थ्याने तो भारताला घाबरवेल, असे पाकिस्तानला वाटत होते, परंतु इस्राईल आणि युएईच्या मैत्रीमुळे भारत युएईच्या जवळ आला आहे. ज्या देशाबरोबर पाकिस्तान अवलंबून असतो. तो देश आता भारताचा चांगला मित्र बनला आहे यावरून पाकिस्तान त्रस्त आहे.

इस्त्राईल, युएईची घनिष्ठ मैत्री आणि या दोघांशी भारताच्या चांगल्या संबंधांमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे देश तसेही चीनच्या विरुद्ध भारताची साथ देतात. भारताची शक्ती दररोज कशी वाढत आहे हे चीन आणि पाकिस्तानला पचत नाहीये.

fallbacks

पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा

15 सप्टेंबर रोजी इस्रायल आणि युएईमधील मैत्री पाकिस्तानच्या डोळ्यात खूपसत होते. त्यात इस्राईलचे राजदूत रॉन मल्का यांनी पाकिस्तानच्या जखमेवर आणखी मीठ चोळल. त्यांनी भारत, इस्राईल आणि युएई दरम्यानच्या त्रिपक्षीय संबंधांविषयी वक्तव्य केले आणि पाकिस्तानला आता ही गोष्ट टोचत आहे.

भारत, इस्राईल आणि युएईला एकत्र येण्याचे आवाहन रॉन यांनी केले आहे. वास्तविक भारत आणि इस्राईल हे चांगले मित्र आहेत, हे संपूर्ण माहित आहे. भारत आणि इस्राईलमध्ये संरक्षण आणि तंत्रज्ञान करार देखील आहेत. दुसरीकडे, युएईबरोबरही भारताचे चांगले व्यापारी संबंध आहेत. अशा परिस्थितीत जर इस्राईल, युएई आणि भारत एकत्र आले तर ते पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा ठरेल.

अरब देशांमध्ये युएई सुपर पॉवर

युएईकडे अरब देशांमध्ये सुपर पॉवर म्हणून पाहिले जाते. अलीकडच्या काळात भारताशी त्याचे संबंधही सुधारले आहेत. 370 च्या मुद्यावर पाकिस्तानने युएईकडे पाठिंबा मागितला होता. पण यूएईने हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं म्हणतं पाकिस्तानला दणका दिला होता. त्यामुळे भारताचे यूएईसोबत असलेले संबंध दिसतात. भारताविरूद्ध होत असलेल्या वक्तव्यामुळे यूएईने पाकिस्तानकडून १ अब्ज डॉलर्सचं दिलेलं कर्ज परत मागितलं होतं.

मुस्लीम देशांमध्ये परमाणु शक्ती असणारा देश म्हणून पाकिस्तानला मान्यता आहे. अशा परिस्थितीत त्यांची स्थिती त्यांच्यात कमी असू शकत नाही परंतु भविष्यकाळात इस्रायल-युएई आणि भारत यांच्यातील मैत्री चांगली झाल्याने मुस्लीम देशांमधील भारत आणि इस्राईलची प्रतिमा नक्कीच बदलेल.

पाकिस्तानसाठी युएईसारखे श्रीमंत देश हे सोन्याचं अंड देणारी कोंबडी प्रमाणे आहे. पाकिस्तान यूएईकडून कर्ज घेते. पण युएई, भारत आणि इस्राईलचे त्रिपक्षीय संबंध यावर नक्कीच परिणाम करु शकतात. कारण भारत हा पाकिस्तानमधील दहशतवादावर नेहमी जगभरात आपली बाजू मांडत आला आहे. पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी भारत प्रयत्न करतो. त्यामुळे अनेक देशांनी पाकिस्तानला देत असलेली मदत देखील थांबवली आहे. पाकिस्तान मुस्लीम देशांमध्ये भारताविरूद्ध वातावरण निर्माण करतो. पण यूएई सारखा देश जर भारताच्या बाजुने उभा राहिला तर याचा एक मोठा संदेश संपूर्ण जगात जातो. आतापर्यंत यूएईने भारताविरुद्धच्या पाकिस्तानच्या अनेक मागण्या फेटाळून लावल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही गोष्ट अधिक चांगली माहिती आहे. हेच कारण आहे की पंतप्रधान मोदींनी गेल्या 6 वर्षात 3 वेळा युएईला भेट दिली. ज्यामुळे भारत आणि युएईमधील संबंध दृढ झाले.

fallbacks

नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांना यश

2015 मध्ये नरेंद्र मोदी युएईला गेले होते. त्यावेळी भारतीय पंतप्रधानांचा युएई दौरा खूप महत्वाचा होता कारण भारतीय पंतप्रधान बर्‍याच वर्षांपासून तेथे होते. मैत्रीच्या या पुढाकाराने युएईनेही दोन पावले पुढे आला. 2017 मध्ये अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद प्रमुख पाहुणे म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये उपस्थित होते.

इस्राईल तंत्रज्ञानाचा राजा आहे. युएई एक मोठा गुंतवणूकदार आणि मेहनती लोकांचा एक तरुण देश आहे. हे जर ते एकत्र आले तर पाकिस्तानसाठी अडचण होऊ शकतो. दुसरीकडे चीनसारख्या लबाड देशाला देखील याचा फटका बसेल. इस्राईल आणि युएई दरम्यानच्या मैत्रीमुळे भारताला बळकटी मिळाली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही ही मैत्री भारतासाठी एक उत्तम संधी असल्याचे म्हटले आहे.

Read More