Marathi News> पश्चिम महाराष्ट्र
Advertisement

चाकण हिंसाचार: पोलिसांकडून संशयितांची धरपकड सुरु, रात्रभरात २३ जण ताब्यात

नवी मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये या आंदोलनाला हिंसक वळणही लागले होते.

चाकण हिंसाचार: पोलिसांकडून संशयितांची धरपकड सुरु, रात्रभरात २३ जण ताब्यात

पुणे: सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान सोमवारी चाकणमध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी रात्रीपासून पोलिसांनी ही कारवाई सुरु केली. त्यानंतर आतापर्यंत तब्बल २३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांची नावे पोलिसांकडून गुप्त राखण्यात आली असून त्यांची चौकशी सुरु आहे. 
 
 गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नवी मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये या आंदोलनाला हिंसक वळणही लागले होते. या पार्श्वभूमीवर या आंदोलनात समाजविघातक शक्तींनी शिरकाव केल्याची भीती काही नेत्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे पोलिसांकडून या आंदोलनावर करडी नजर ठेवली जात आहे. 


 पुणे शहरात सोमवारी आंदोलनावेळी चाकण, राजगुरुनगर आणि पिंपरी-चिंचवड येथील परिस्थिती हाताबाहेर गेली होती. याठिकाणी हिंसक जमावाकडून वाहनांची मोठ्याप्रमाणावर जाळपोळ करण्यात आली होती. यामुळे चाकणमध्ये जमावबंदी लागू करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर पोलिसांनी ४ हजार समाजकंटकांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. 

Read More