यवतमाळ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शेतकऱ्याच्या पत्नीने सरकारला जाब विचारलाय. व्यवस्थेने माझ्या नवऱ्याचा बळी घेतला, असे सांगत साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांनी जोरदार टीका केली. आमच्यावर हात टाकला तर आम्ही तसेच उत्तर देतो, असा इशाराही दिला.