मुंबई-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस कसारा आणि इगतपुरी दरम्यान अपघात झाला. गाडीचे मागून दुसऱ्या डब्याचे चाक घसरले. पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांनी हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. या दुर्घटनेमुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तीन पैकी दोन मार्गावरुन सध्या वाहतूक सुरु आहे. मुंबईहून येणारी मुंबई - गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेसचा एक डबा कसारा घाटात घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र कसाऱ्या पुढील वाहतूक ठप्प झाली आहे.