माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ गायक भूपेन हजारीका आणि नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातला सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे भारतरत्न पुरस्कार आहे. नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. देशाच्या राजकारणातील योगदानाबाबत प्रणव मुखर्जी यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.