मी जो काही आहे जो काही मी घडलो तो फक्त आणि फक्त आचरेकरांमुळेच असे म्हणत सचिन तेंडुलकरने आचरेकर सरांच्या आठवणींना उजाळा दिला. मी २४ वर्षे भारतासाठी फलंदाजी करू शकलो त्याचं कारण फक्त आणि फक्त आचरेकर सर होते असेही सचिनने म्हटले आहे. मुंबईतील शिवाजी पार्क या ठिकाणी आचरेकर सरांची स्मृती सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सचिन तेंडुलकरने त्यांच्या आठवणी जागवल्या.