मंत्रालयासमोर कोणत्याही नियोजनाअभावी बांधण्यात आलेल्या पायर्या आज जेसीबी लावून तोडण्यात आल्या. मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर या पायर्या बांधण्यात आल्या होत्या. मात्र त्याचा कधीही वापर झाला नाही. लांबसडक असलेल्या या पायर्या बांधण्यासाठी जनतेच्या करातील लाखो रुपये खर्च झाले आहेत.