२०१९ ची निवडणूक ही भाजपासाठी नव्हे तर भारतासाठी आहे. गेल्या ५ वर्षांत देशाने अनेक ऐतिहासिक क्षण पाहिले आहेत. २०१९ हे वर्ष भारताचे भविष्य आणि भवितव्य खऱ्या अर्थाने कुठे जाईल हे ठरवणारे आहे. त्यामुळे देशातील जनतेने महाआघाडीचे खिचडी सरकार सत्तेवर आणण्यापेक्षा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमताने सत्तेत आणावे असे आवाहन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये असलेले अनेक लोक भाजपत असून काँग्रेस हा रिकामा पक्ष असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.