लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत्यांनी केलेल्या आंदोलनामुळे १० कोटींचे व्यवहार ठप्प होते. सुमारे २०० आडत्ये या आंदोलनात सहभागी झाले होते. या आडत्यांचे १५० ते २०० कोटी रुपये समितीतील मोठ्या व्यापाऱ्यांकडे थकलेले आहेत, परिणामी शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेल्या कृषी मालाचे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे या आडत्यांकडे नाहीत ,त्यामुळे बाजार समितीच्या मुख्य प्रवेशव्दारावर आडत्यांनी धरणं धरलं.