कर्नाटक विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदार मुंबईच्या पवईमधल्या रेनेसन्स हॉटेलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. या नाराज आमदारांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार हॉटेल परिसरात पोहोचले मात्र, रोखण्यात आले. याबाबत वेणुगोपाल यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.