पुणे-बंगळुरू महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात औरंगाबादचे सात जण जागीच ठार झालेत. बेळगावमधील श्रीनगर येथील महामार्गावर दुपारी दीड वाजता हा अपघात झाला. अपघातात कारचा चेंदामेंदा झाल्याने कारमधील मृतदेह बाहेर काढण्यासाठी वेळ लागला. तसेच या अपघातात ट्रकची समोरील बाजू चेपली गेली आहे. बेळगाव वाहतूक उत्तर विभाग पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.