पुणे-सोलापूर महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघातात ९ विद्यार्थी जागीच ठार झालेत. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना गाडीत बाहेर काढणे अवघड झाले होते. हे सर्व विद्यार्थी यवतचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जण महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. काल सकाळी सर्व यवत येथून रायगडला फिरण्यास गेले होते. ते घरी परतत होते. त्यावेळी हा भीषण अपघात झाला.