World Cup 2019 : 'वर्ल्ड कप जिंकून जामनगरला आण'; जडेजाच्या पत्नीची इच्छा
टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकण्यापासून केवळ २ पावलं दूर आहे.
Updated: Jul 09, 2019, 06:31 PM IST
राजकोट : टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकण्यापासून केवळ २ पावलं दूर आहे. टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध टक्कर सुरु आहे. रविंद्र जडेजाने वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलावी आणि ती जामनगरला आाणावी, अशी इच्छा रविंद्र जडेजाच्या पत्नीने व्यक्त केली आहे. हा क्षण आमच्यासाठी अभिमानास्पद क्षण असेल, असं जडेजाची पत्नी म्हणाली.
'रविंद्र जडेजा वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन परतावा, अशी जामनगरच्या लोकांची इच्छा आहे. रणजीत सिंह आणि दलीप सिंह हे दोघे देखील जामनगरचेच होते. लोकांना आशा आहे की रविंद्र वर्ल्ड कप घेऊन येईल', असे जडेचाची पत्नी रिवाबा म्हणाली.
'जडेजाला अंतिम-११ मध्ये स्थान मिळो अथवा न मिळो, त्याच्या खेळाच्या प्रती असलेला समर्पण भाव कायम असतो. मी त्याच्या समर्पणासाठी त्याला सलाम करते. जडेजाला जेव्हा जेव्हा खेळण्याची संधी मिळते, तेव्हा तेव्हा तो १०० टक्के प्रयत्न करत असतो, अशी प्रतिक्रिया रिवाबाने दिली.
रवींद्र जडेजाने न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये १० ओव्हर टाकून ३४ रन दिल्या आणि एक विकेट घेतली. जडेजाने हेनरी निकोल्सला २८ रनवर माघारी पाठवलं. जडेजाने १९व्या ओव्हरला ही विकेट घेतली.
टीम इंडिया वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये सातव्यांदा पोहचली आहे. तर न्यूझीलंडची सेमी फायनलमध्ये पोहचण्याची ही आठवी वेळ आहे. न्यूझीलंड २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये फायनलमध्ये पोहचली होती. तर टीम इंडियाने देखील २०१५ साली सेमीफायनल पर्यंत धडक मारली होती.
टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकण्यापासून केवळ २ पावलं दूर आहे.
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.