Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

World Cup 2019 : ...तर भारताला एवढ्या रनचं आव्हान मिळणार

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पावसाने व्यत्यय आणला आहे.

World Cup 2019 : ...तर भारताला एवढ्या रनचं आव्हान मिळणार

मॅनचेस्टर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पावसाने व्यत्यय आणला आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता पावसाला सुरुवात झाली पण पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये. पावसाचा खेळ सुरु झाला तेव्हा, न्यूझीलंडचा स्कोअर ४६.१ ओव्हरमध्ये २११/५ एवढा होता. या मॅचसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला असला तरी, पाऊस थांबल्यास आजच्याच दिवशी मॅच सुरू होईल. अशात डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला किती रनचं आव्हान मिळेल याचं गणित आता समोर आलं आहे. 

डकवर्थ लुईस नियमानुसार भारतापुढील आव्हान

४६ ओव्हरची मॅच झाली तर भारताला विजयासाठी २३७ रनची गरज 

४० ओव्हरची मॅच झाली तर भारताला २२३ रनची गरज 

३५ ओव्हरची मॅच झाली तर भारताला विजयासाठी २०९ रनची गरज 

३० ओव्हरची मॅच झाली तर भारताला १९२ रनची गरज 

२५ ओव्हरची मॅच झाली तर भारताला १७२ रनची आवश्यकता 

२० ओव्हरची मॅच झाली तर भारताला १४८ रनचं आव्हान 

Read More