Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

विराट कोहलीने घेतलेल्या कॅचवर ऋतुराजने व्यक्त केली शंका?

कालच्या सामन्यादरम्यान आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने एक कॅच पकडला ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

विराट कोहलीने घेतलेल्या कॅचवर ऋतुराजने व्यक्त केली शंका?

दुबई : आयपीएलचा थरार चाहत्यांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळतोय. आयपीएल 2021चा 35 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात काल खेळला गेला. या सामन्यादरम्यान आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने एक कॅच पकडला ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र या कॅचवर चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडने शंका उपस्थित केली आहे. 

कोहलीने चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडचा कॅच विराटने पकडला. विराट कोहलीचा हा झेल पाहिल्यानंतर ऋतुराजसह आरसीबी खेळाडू पाहत बसले. मात्र या कॅचवर शंका उपस्थित केली आणि तो मैदानावर थांबला. दरम्यान ऋतुराज मैदानावर थांबल्याचं पाहताच विराट कोहलीचा देखील काहीसा पारा चढलेला दिसला.

युझवेंद्र चहलच्या 9 व्या ओवरमध्ये दुसऱ्या बॉलवर गायकवाडला पॉईंटच्या दिशेने एक शॉट खेळायचा होता. यावेळी विराट कोहलीने डाईव्ह मारत त्याचा सुंदर कॅच घेतला. मात्र अंपायरने हा कॅच घेतल्यानंतर अंपायरने देखील त्वरित निर्णय दिला नाही. 

विराट कोहलीने घेतलेला या कॅचचा निर्णय पुन्हा तिसऱ्या अंपायरकडे गेला आणि तिथे स्लो मोशन असं दिसून आलं की, कोहलीने हा झेल अतिशय योग्य पद्धतीने घेतला आहे. ऋतुराजसह उर्वरित खेळाडूही कोहलीचा हा कॅच पाहून आश्चर्यचकित झाले.

दरम्यान या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 6 विकेट्सने हरवलं आहे. चेन्नईचा हा सलग दुसरा विजय होता. या विजयासह चेन्नई सध्या पॉईंट्स टेबलमध्ये टॉपच्या स्थानावर आहे. 

Read More