Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'आशिया कप'मधून पाकिस्तान बाहेर, फायनलमध्ये भिडणार भारत - बांग्लादेश

 पाकिस्तानला टूर्नामेंटमधून बाहेर पडावं लागलंय

'आशिया कप'मधून पाकिस्तान बाहेर, फायनलमध्ये भिडणार भारत -  बांग्लादेश

नवी दिल्ली : अबुधाबीत आशिया कपच्या सुपर-4 सामन्यात बुधवारी बांग्लादेशनं पाकिस्तावर 37 रन्सनं मात केली. या पराभवामुळे पाकिस्तानला टूर्नामेंटमधून बाहेर पडावं लागलंय. यानंतर आता शुक्रवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात आता भारताचा मुकाबला बांग्लादेशसोबत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. 

बांग्लादेशी टीमनं अगोदर बॅटिंग स्वीकारत 239 रन्स केले. जिंकण्यासाठी पाकिस्तानला 240 रन्सची आवश्यकता होती... परंतु, पाकिस्तानकडून शोएब मलिक (30 रन्स), आसिफ अली (31 रन्स) बनवले. तर टीम स्कोअर 167 वर असताना इमाम उल हक स्टम्प आऊट झाला... आणि पाकिस्तानची टीम ढेपाळली. त्यानंतर 50 ओव्हर्समध्ये पाकिस्तान टीम केवळ 202 रन्सपर्यंत पोहचू शकली. 

बांग्लादेशकडून मुस्तफिजुर रेहमाननं चार तर मेहदी हसन मिराजनं दोन विकेट घेतल्या. तर रुपल हुसैन, महमुदुल्लाह आणि सौम्य शंकर यांनी एक-एक विकेट घेतल्या. 

Read More