Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2022: KKR च्या पराभवानंतरही कर्णधार श्रेयस अय्यर खूश, म्हणाला...

कालच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला.

IPL 2022: KKR च्या पराभवानंतरही कर्णधार श्रेयस अय्यर खूश, म्हणाला...

मुंबई : डीवाय पाटील स्टेडियमवर बुधवारी झालेल्या आयपीएल 2022 च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. मात्र असं असूनही कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर टीमच्या कामगिरीने आनंदी असल्याचं त्याने सांगितलं आहे. टीमने इतक्या कमी स्कोरमध्येही जो उत्साह दाखवला त्यामुळे अय्यरने आपण खूश असल्याचं सांगितलं.

यानंतर सामना संपल्यानंतर अय्यर म्हणाला, “हा एक रोमांचक सामना होता. जेव्हा आम्ही गोलंदाजी करायला आलो तेव्हा मी टीमला सांगितलं की, आज आम्ही ज्या प्रकारे खेळलो त्यावरून आमची वृत्ती दिसून येते. आम्ही मैदानावर ज्या पद्धतीने स्पर्धा केली त्यावरून आमची मानसिकता आगामी सामन्यांमध्ये दिसून येईल. शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना खेळवला त्याचा मला खरोखर गर्व आहे."

अय्यर पुढे म्हणाला, “शेवटी मी व्यंकटेश अय्यरला गोलंदाजी करण्यास दिली. कारण आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही गोलंदाजी केली आहे. तुम्हाला तुमच्या खेळाडूंवर विश्वास ठेवावा लागेल. कोणत्याही खेळाडूचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा सर्वोत्तम सामना होता."

टॉस हारल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकाताच्या टीमचा डाव 18.5 ओव्हरमध्ये सर्वबाद 128 रन्सवर आटोपला. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बंगळुरूने 19.2 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावत विजयाला गवसणी घातली. बंगळुरूचा हा यंदाच्या सिझनमधील पहिला विजय होता.

Read More