Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

विराट कोहलीने सांगितलं आरसीबीच्या हरण्यामागचं कारण

 मुंबईच्या संघाने आरसीबीला धूळ चारली

विराट कोहलीने सांगितलं आरसीबीच्या हरण्यामागचं कारण

अबु धाबी : बंगळुरू विरुद्ध मुंबई या संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईच्या संघाने आरसीबीला धूळ चारली. सुर्यकुमार यादवच्या ४३ चेंडूंमध्ये त्यानं १० चौकार आणि ३ षटकारांची बरसात करत नाबाद ७९ धावांच्या जोरावर मुंबईने ही मॅच सहज खिशात टाकली. आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीने मुंबई इंडीयन्सच्या बॉलिंगचे कौतूक करत आपली टीम २० रन्सने मागे राहील्याचे म्हटले. 

आरसीबीला ६ विकेट्सच्या बदल्यात १६४ रन्सवर रोखल्यावर मुंबईने बॉल्स राखून हे लक्ष्य पार केलं. मुंबईतर्फे जसप्रित बुमराहने १४ रन्स देऊन तीन विकेट घेतले. आरसीबीचे फलंदाज शेवटच्या पाच ओव्हरमध्ये केवळ ३५ रन्सच करु शकले. शेवटच्या पाच ओव्हरमध्ये आमची बॅटींग चांगली झाली नाही. आम्ही खेळलेले शॉट्स त्यांच्या फिल्डर्सकडे जात होते, मैदानात असंच होतं असे कोहली म्हणाला. 

आम्ही चांगली बॉलिंग केली आणि शेवटच्या पाच ओव्हरमध्ये २० रन्सने मागे राहीलो. दोन मॅच जिंकून आमची टीम टॉप २ मध्ये जागा बनवू शकते असे कोहलीने म्हटले. काही टीम आपला बेस्ट परफॉर्मन्स लगेच देतात तर काही चुकीच्या वेळी खराब खेळ करतात. पॉईंट टेबलवरील शेवटच्या पाच टीम चांगला खेळ करत आहेत. आम्हाला दोन मॅच आणखी खेळायच्या आहेत आणि टॉप २ मध्ये राहायचं असल्याचे कोहली म्हणाला.

आपली बाजू जड आहे असं वाटत असणाऱ्या विराट सेनेचा मुंबईच्या संघानं धुव्वा उडवून दिला. बंगळुरूच्या संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा केली जात असतानाच विराटसह काही खेळाडूंनी क्रीडारसिकांची निराश केली. सामन्यात प्रथम फलंदाजी केल्यानंतर या संघाचं आव्हान पेलत मुंबईनं हा सामना खिशात टाकला.

पाच गडी राखत मुंबईनं बंगळुरू संघाला पराभूत केलं आणि यंदाच्या वर्षीच्या IPL 2020 मधील या हंगामात प्ले ऑफमधील स्थान भक्कम केलं. देवदत्त पडिक्कलच्या शतकी खेळीच्या बळावर बंगळुरूच्या संघानं प्रथम फलंदाजी करत मुंबईसमोर १६४ धावांचा डोंगर रचला. याच आव्हानाला सामोरं जाण्यासाठी मुंबईचा संघ मैदावनावर आला.

क्विंटन डिकॉक अवघ्या १८ धावांवर बाद झाला. त्यामागोमाग इशान किशनही फार काळ खेळपट्टीवर टीकू शकला नाही. कृणाल आणि हार्दिक पांड्यालाही प्रभावी खेळ करता आल नाही. एकिकडे संघाची ही अवस्था असतानाच दुसरीकडे सूर्यकुमार यादवनं मात्र खऱ्या अर्थानं संघाला विजयी टप्प्यावर आणलं. ४३ चेंडूंमध्ये त्यानं १० चौकार आणि ३ षटकारांची बरसात करत नाबाद ७९ धावा केल्या. संघाला विजय मिळवून दिल्यानंतर त्यानं मोठ्या आत्मविश्वासानं दिलेली प्रतिक्रिया सामन्याला उपस्थित खेळाडूंपासून ते टीव्हीवर हा सामना पाहणाऱ्या प्रत्येकाचीच मनं जिंकून गेली.

Read More