Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

INDIA VS SCOTLAND : भारतासमोर विजयासाठी 86 धावांचं आव्हान

उपान्त्य फेरी गाठण्याच्या आशा जिंवत ठेवण्यासाठी भारताला हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे

INDIA VS SCOTLAND : भारतासमोर विजयासाठी 86 धावांचं आव्हान

T20 World Cup : टी20 विश्वचषक स्पर्धेत (ICC T20 World Cup) उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला (Team India) आजचा स्कॉटलंडविरुद्धचा (Scotland) सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामन्यात टॉस जिंकून भारताने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार विराट कोहलीने घेतलेला हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर स्कॉटलंडचा संघ 85 अवघ्या धावांवर ऑलआऊट झाला. भारतासमोर विजयासाठी आता 86 धावांचं आव्हान आहे.

भारतातर्फे मोहम्द शमी आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने 2 आणि आर अश्विने 1 विकेट घेतली. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर स्कॉटलंडच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. 

उपान्त्य फेरी गाठण्यासाठी भारताला हा सामना मोठ्या फरकाने जिंकवा लागणार आहे.

Read More