Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

बांग्लादेशला हरवून भारत विजयी गुढी उभारणार?

टी-20 ट्रायसीरिजमध्ये उद्या म्हणजेच रविवारी भारताचा सामना बांग्लादेशशी होणार आहे.

बांग्लादेशला हरवून भारत विजयी गुढी उभारणार?

कोलंबो : टी-20 ट्रायसीरिजमध्ये उद्या म्हणजेच रविवारी भारताचा सामना बांग्लादेशशी होणार आहे. यंदाच्या मोसमातला भारताचा हा शेवटचा सामना असेल. यानंतर सगळे खेळाडू आयपीएलमध्ये त्यांच्या टीमकडून खेळतील. श्रीलंकेचा पराभव करुन बांग्लादेश या सीरिजच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

या सीरिजमधली श्रीलंकेविरुद्धची पहिली टी-20 भारतानं गमावली तर बांग्लादेशविरुद्धच्या दोन्ही टी-20 आणि श्रीलंकेविरुद्धची उरलेली एक टी-20 भारतानं जिंकली. या सीरिजमधल्या एकूण ४ टी-20 भारतानं जिंकल्या. तर बांग्लादेशनं या सीरिजच्या दोन्ही मॅचमध्ये श्रीलंकेचा पराभव केला.

भारताचं पारडं जड

या सीरिजमध्ये भारतानं दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत ही सीरिज खेळतोय. पण तरीही या मॅचमध्ये भारताचंच पारडं जड आहे. आत्तापर्यंत भारत आणि बांग्लादेशमध्ये ७ टी-20 मॅच झाल्या आहेत. या सगळ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे. त्यामुळे ही मॅच जिंकून विजयी गुढी उभारण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल. 

Read More