Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Rohit sharma कर्णधार होताच या 3 खेळाडूंना भारतीय संघात मिळू शकते संधी

Rohit sharma कर्णधार झाला तर रोहित टीम इंडियामध्ये या 3 खेळाडूंना संधी देऊ शकतो.

Rohit sharma कर्णधार होताच या 3 खेळाडूंना भारतीय संघात मिळू शकते संधी

मुंबई : 2021 च्या T20 WORLD CUP स्पर्धेतील टीम इंडियाचा प्रवास उपांत्य फेरीपूर्वी संपलाय. सोमवारी भारताने नामिबियाविरुद्धचा शेवटचा सामना 9 गडी राखून जिंकला. हा सामना विराट कोहलीचा (Virat Kohli) T20 कर्णधार म्हणून शेवटचा सामना होता. विराट कोहलीने टी-20 फॉरमॅटमध्ये भारताचे कर्णधारपद सोडले आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत रोहित शर्माकडे टी-20 चे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. प्रत्येक कर्णधाराच्या आगमनाने संघात मोठे बदल होतात. टीम इंडियाचे असे 3 खेळाडू आहेत, ज्यांना रोहित शर्मा (Rohit Sharma) कर्णधार बनताच संघात स्थान मिळू शकते.

1. राहुल चहर

रोहित शर्मा कर्णधार होताच युवा लेगस्पिनर राहुल चहरचे नशीब चमकू शकते, तो टीम इंडियाच्या T20 क्रिकेट संघाचा कायमस्वरूपी सदस्य होऊ शकतो. राहुल आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. राहुल चहर गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याची लेग स्पिन वाचणे सोपे नाही. T20 विश्वचषक 2021 च्या शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने वरुण चक्रवर्तीच्या जागी राहुल चहरला संधी दिली.

2. ईशान किशन

रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार झाला तर युवा फलंदाज इशान किशनला टी-20 आणि वनडे संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संधी मिळू शकते. इशान किशन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून रोहित शर्मासोबत खेळतो. इशान किशन हा अतिशय स्फोटक फलंदाज आहे. त्याने मुंबई इंडियन्ससाठी खूप धावा केल्या आहेत. ईशान भारतासाठी कोणत्याही क्रमाने फलंदाजी करू शकतो. विराटच्या नेतृत्वाखाली इशानला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने ते सिद्ध केले आहे. इशानने पदार्पणाच्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले.

3. कृणाल पंड्या

क्रृणाल पांड्याने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. क्रृणाल फलंदाजीसोबतच गोलंदाजीही करू शकतो. हा स्टार अष्टपैलू खेळाडू टीम इंडियाच्या वाटेवर दार ठोठावत आहे. कृणाल पंड्या हा आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने मुंबई इंडियन्ससाठी अनेक सामने जिंकले आहेत.

 

Read More