Hardik Pandya Natasa Stankovic: भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Padnya) आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक (Natasa Stankovic) गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या खासगी आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत आहेत. हार्दिक आणि नताशा यांचा घटस्फोट झाल्याची ही चर्चा असून त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून ते एकत्र नसल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान घटस्फोटानंतर नताशा 70 टक्के संपत्तीवर दावा करु शकते असं बोललं जात आहे. मात्र दोघांनीही यावर अधिकृतपणे भाष्य कऱणं टाळलं आहे. त्यातच आता नताशाने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या या व्हिडीओतून नताशाने अप्रत्यक्षपणे आपल्या घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य केल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे. व्हिडीओत नताशा जोपर्यंत पूर्ण माहिती नसेल तोपर्यंत एखाद्याच्या चरित्रावर प्रश्न उपस्थित करु नये असं आवाहन केलं आहे.
नताशा व्हिडीओत सांगत आहे की, "मी येथे बसून कॉफीचा आनंद घेत आहे. यावेळी अचानक माझ्या मनात एक विचार आला की, लोक किती लवकर एखाद्याच्या चारित्र्याबद्दल मत निर्माण करतात. जेव्हा एखादी व्यक्ती नेहमीपेक्षा वेगळी वागते, तेव्हा आपण सहानुभूती न दाखवता, निरीक्षण न करता फार लवकर त्याच्या चारित्र्याबद्दल मत निर्माण करतो. त्यांना नेमकं काय झालं, या वागण्यामागे नेमकी काय परिस्थिती आहे याचा विचार करत नाही".
Hardik Pandya’s wife finally breaks her silence on divorce rumors.
— Sann (@san_x_m) July 10, 2024
Guys, please watch before it gets deleted. #HardikPandya #NatasaStankovic pic.twitter.com/1QaPy7R9n8
तिने सल्ला देताना म्हटलं आहे की, "एखाद्याला जज न करता सहानुभूती दाखवा, निरीक्षण करा. आणि थोडा संयम बाळगा".
काही दिवसांपूर्वी नताशाने एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने वाईट वेळ असताना देव आपल्या पाठीशी असतो असं सांगितलं होतं. तिने बायबलचा दाखला देत म्हटलं होतं की, देव तुम्हाला कधीही सोडणार नाही, त्यामुळे भिती, अस्वस्थता यासारख्या गोष्टी तुमच्या मनातून काढून टाका. नताशा म्हणाली की, जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती वाईट परिस्थितीतून जात असते तेव्हा त्याचे मनोबल घसरते, परंतु देव नेहमीच तुमच्यासोबत असतो.
नताशाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हार्दिक पांड्याशी संबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्यानंतर दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली होती. दरम्यान भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर देशासह संपूर्ण जगभरातून त्यांचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या जात आहेत. पण नताशाने अद्यापपर्यंत विजयासंबंधी एकही पोस्ट शेअर केलेली नाही. इतकंच नाही तर तिने साधा हार्दिकचा फोटोही शेअर केला नाही. यामुळेच दोघांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे.