Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

रोहित शर्मा नंतर हा बनणार Team India चा कर्णधार, BCCI ने दिले संकेत

रोहित शर्मा देखील आता 35 वर्षाचा होत आला आहे. त्यामुळे त्याच्या नंतर टीम इंडियाचा नवा कर्णधार कोण होणार याबाबत बीसीसीआयने संकेत दिले आहेत.

रोहित शर्मा नंतर हा बनणार Team India चा कर्णधार, BCCI ने दिले संकेत

मुंबई : टीम इंडिया आता उद्यापासून वेस्ट इंडिज विरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या संघाला ही मालिका जिंकायची आहे. मात्र या मालिकेपूर्वीच उपकर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला. यानंतर टीम इंडियाला नवा उपकर्णधार मिळाला आहे. यासोबतच बीसीसीआयने रोहितनंतर संघाचा पुढचा कर्णधार कोण होणार याचेही संकेत दिले आहेत.

हा खेळाडू नवा उपकर्णधार

केएल राहुलच्या दुखापतीनंतर नवा उपकर्णधार कोण होणार हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, बीसीसीआयने या पदासाठी एका खेळाडूची निवड केली आहे. होय, या खेळाडूचे नाव आहे ऋषभ पंत. हा 24 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज राहुलच्या जागी टीम इंडियाचा नवा उपकर्णधार असेल. पंतला आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे आणि राहुलच्या अनुपस्थितीत तो नवा उपकर्णधार झाला. पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने गेल्या वर्षी अप्रतिम कामगिरी केली.

बीसीसीआयचे संकेत

बीसीसीआयनेही आता रोहितनंतर संघाचा पुढचा कर्णधार ऋषभ पंत असेल असे संकेत दिले आहेत. खुद्द सुनील गावसकर सारखे मोठे दिग्गज देखील पंत कर्णधार बनण्यास सक्षम आहे हे मान्य करतात. अलीकडे, जेव्हा नवीन कसोटी कर्णधाराचा प्रश्न आला तेव्हा गावस्कर यांनी पंतला नवा कर्णधार बनवण्याचा आग्रह धरला होता. अखेरीस पंत आता भारतीय संघाच्या नेतृत्वाचा एक भाग असेल. पंत हा भारताचा पुढचा कर्णधार होऊ शकतो हे निश्चित दिसते.

अलीकडेच, BCCI ने घोषित केले आहे की उपकर्णधार KL राहुल आणि स्टार अष्टपैलू अक्षर पटेल यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेतून वगळण्यात आले आहे. यानंतर काल आणखी एक अपडेट आले की वॉशिंग्टन सुंदरही या मालिकेतून बाहेर झाला आहे. रोहित शर्मासाठी हा मोठा धक्का आहे कारण राहुल हा संघातील सर्वात मजबूत फलंदाज आहे आणि रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीत अक्षर पटेल आणि सुंदरसारखे अष्टपैलू खेळाडू टीम इंडियासाठी खूप प्रभावी ठरू शकले असते.

Read More