Marathi News> भविष्य
Advertisement

किचन बाथरूमशी संबंधीत 'या' ५ चुका, व्यक्तीला बनवतील कंगाल

कर्ज फेडताना खूप त्रास होतो. त्यामुळे किचनशी संबंधीत ५ चूका अजिबात करू नका.

 किचन बाथरूमशी संबंधीत 'या' ५ चुका, व्यक्तीला बनवतील कंगाल

मुंबई : अनेकदा एक छोटीशी चूक आयुष्यभरासाठी महागात पडते. या गोष्टी मोठ्या संकटाचं कारण बनतात. वास्तुशास्त्रानुसार वास्तूशी संबंधीत केलेल्या चुका तुम्हाला संकटात टाकतात. तसेच घराचा उत्कर्ष देखील होत नाही. या व्यतीरिक्त त्या घरातील व्यक्तीच्या कर्जात वाढ होते. हे कर्ज फेडताना खूप त्रास होतो. त्यामुळे किचनशी संबंधीत ५ चूका अजिबात करू नका. 

वास्तुशी संबंधीत चूका तुम्हाला कंगाल करतील 

बहुतांश घरांमध्ये कचरा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे डस्टबिन घराबाहेर किंवा प्रवेशद्वारावर ठेवलेले असतात. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने लक्ष्मी देवी क्रोधित होते. या चुकीमुळे माणूस कंगाल होऊ शकतो असे वास्तू तज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत घराचे प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवावे.

बरेच लोक घरी बेडवर आरामात बसून अन्न खातात. याबाबत वास्तुशास्त्रात कडक इशारा देण्यात आला आहे. वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की, या एका चुकीमुळे माणूस गरीब होऊ शकतो. याशिवाय ही चूक कुटुंबाच्या सुख-समृद्धीमध्ये अडथळे निर्माण करते.

वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये घाण आणि उघडी भांडी ठेवणे अशुभ आहे. जर काही कारणास्तव तुम्ही रात्री खोटी भांडी साफ करत नसाल तर ती स्वयंपाकघरात ठेवू नका. रात्री, स्वयंपाकघर व्यवस्थित साफ केल्यानंतर, आपण झोपायला जावे. वास्तविक, असे न केल्याने जीवनात आर्थिक संकट येते.

शास्त्रात दानाला विशेष महत्त्व दिले आहे. काही गोष्टी संध्याकाळी इतरांना देऊ नयेत. वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी दूध, दही आणि मीठ दान करू नये, कारण असे केल्याने घरामध्ये गरिबी राहू लागते.

वास्तुशास्त्रानुसार रात्री बाथरूममध्ये पाण्याची भांडी रिकामी ठेवू नयेत. बाथरूममध्ये किमान एक बादली पाण्याने भरली पाहिजे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. हे तुम्हाला आर्थिक संकटातूनही वाचवते.

Read More