Marathi News> भविष्य
Advertisement

Astro Tips : संध्याकाळी दिवा लावताना हे एक काम करा, धन देवीची होते मोठी कृपा; होईल आर्थिक भरभराट

Mantra For Diya: हिंदू धर्मात पूजेला खूप महत्व आहे. संध्याकाळी आपण आपल्या घरात दिवा लावतो. संध्याकाळी दिवा लावल्याने अंधार दूर होतो. तसेच देवासमोर दिवा लावल्याने माणसाच्या जीवनातील अंधार दूर होतो, असे म्हणतात. संध्याकाळी देवासमोर दिवा लावताना या मंत्राचा जप केल्यास फायदा होतो. 

Astro Tips : संध्याकाळी दिवा लावताना हे एक काम करा, धन देवीची होते मोठी कृपा; होईल आर्थिक भरभराट

Mantra Jaap : हिंदू धर्मात प्रथेला नेहमीच प्राधान्य देण्यात आले आहे. हिंदू धर्मात, उपासनेशी संबंधित प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे महत्त्व आहे. घरामध्ये दिवा लावल्याने घरातील अंधार दूर होतो असे म्हणतात. तसेच देवासमोर दिवा लावल्याने माणसाच्या जीवनातील अंधार दूर होतो. इतकेच नाही तर जीवनातील नकारात्मकता गोष्टी, गरिबी, रोग, दुःख दूर होऊन व्यक्तीला प्रत्येक कार्यात यश मिळते.  संध्याकाळी देवासमोर दिवा लावताना या मंत्राचा जप केल्यास फायदा होतो.  

ज्योतिषशास्त्र सांगते की दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते. दिव्याला घरातील सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. घरात दिवा लावल्याने सकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाहीत. त्याचबरोबर दिव्याची ज्योत व्यक्तीच्या प्रगतीचे प्रतीक मानली जाते असे मानले जाते. या दरम्यान दिवा लावताना मंत्रांचा जप विशेष लाभदायक मानला जातो. संध्याकाळी दिवा लावताना कोणत्या मंत्राचा जप करावा, ते जाणून घ्या.

का लावला जातो दिवा...

हिंदू धर्मातील कोणत्याही पूजा-विधीच्या वेळी विशेष मंत्रांचा उच्चार केला जातो. शास्त्रात मंत्रजपाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. मंत्रोच्चाराने कोणतेही काम केल्यास त्यात पूर्ण यश मिळते आणि पूजा पूर्ण मानली जाते, असे म्हटले जाते. 

शास्त्रात काही मंत्रांमध्ये संध्याकाळी दिवा लावायला सांगितले जाते. संध्याकाळच्या वेळी या मंत्रांचा जप केल्याने जीवनात लाभ होतो असे म्हटले जाते. 

संध्याकाळी दिवा लावताना या मंत्राचा जप करा

शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय नमोस्तुते।।
दीपो ज्योति परंब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दन:।
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोस्तुते।।

मंत्र जप करण्याचे फायदे

ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की, पूजा करताना मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला विशेष लाभ होतो. या मंत्राचा अर्थ असा आहे की, जो दिवा आपण भगवंतांसमोर लावला आहे, तो आपल्याला मंगल, कल्याण, आरोग्य, व्याधी नष्ट होऊन धन-संपत्तीची वृद्धी होवो. चांगली बुद्धी मिळू दे आणि व्यक्तीच्या पापांचा नाश होऊ दे. 

 

(Disclaimer:  येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Read More