ाळी असलेल्या टिळ्याला खुप मोठं महत्त्व आहे. हिंदू शास्त्रात विठ्ठल...
काही जण कपाळी टिळा लावल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. त्यामुळे धार्मिकदृष्ट्या हळद, कुंकू, अष्टगंध आणि चंदनाला खूप पवित्र मानलं जातं.
अध्यात्माप्रमाणे वैज्ञानिकदृष्ट्या देखील कपाळी टिळा लावण्याचे खूप फायदे आहेत.
चंदनचा गुणघर्म थंड असतो त्यामुळे दोन भुवयांच्या मध्ये चंदनाचा टिळा लावल्याने डोकं शांत राहतं.
हळद, कुंकू, अष्टगंध,अबीर आणि चंदन हे जंतूनाशक असल्याने कपाळी लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते.
जर तुम्हाला मानसिक ताण तणाव जाणवत असेल तर कपाळी चंदन लावल्याने मन शांत राहतं.
पंढरपुरच्या पांडुरंगांच्या भाळी अबीर आणि चंदनाचा टिळा लावला जातो. पूर्ण कपाळापासून ते नाकापर्यंत हा विठ्ठलाचा टिळा कायमच आकर्षक वाटतो.
असं म्हणतात की, विष्णू क्षीरसागरात शेष नागावर आराम करायचे. जेव्हा विष्णुंनी पांडुरंगाचा अवतार धारण केला, त्यावेळी शेषनागाला त्यांनी चंदनाच्या टिळ्यामधून मस्तकी धारण केलं अशी आख्यायिका सांगितली जाते.
विठ्ठलाच्या भाळी असलेल्या टिळ्याच्या आकार हा शेषनागागाचा असल्याचं म्हटलं जातं.
अबीर आणि चंदनाच्या टिळ्यामधून पांडुरंग अवतारात विष्णुंनी शेषनागाला त्यांच्या जवळचं स्थान दिलं.
अबीर आणि चंदनाच्या टिळ्यामधून पांडुरंग अवतारात विष्णुंनी शेषनागाला त्यांच्या जवळचं स्थान दिलं.
शेषनागाची देवांप्रती असलेली निष्ठा पाहून विष्णुंनी विठ्ठल अवतारात त्याला मस्तकी धारण केलं,असं म्हटलं जातं.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)