arathi: नात्यातलं जून प्रेम कमी झालंय आणि नात्यात दूरावा येऊ लागलाय असं वाटतं असेल तर आपल्याला उपाय करणं आवश्यक आहे. तेव्...
आपल्या नात्यात अनेकदा दुरावा येतो परंतु त्याचे आपल्यालाच नक्की काय कारण आहे ते कळतं नाही. त्यातून अहंकार आणि भीतीमुळे आपलं नातं हे अजूनच खराब होऊन जाते.
यामुळे नात्यातल्या दुरावा वाढतो. या दुराव्यामुळे फार मोठ्या प्रमाणात भांडणं आणि द्वेषाची भावनाही तयार होऊ शकतो. या सगळ्या नकारात्मकेतेमुळे आपल्याला आपलं जुनं प्रेम हवेसे वाटते.
आपल्याला आपल्या पार्टनरला सोडायचे नसते आणि सोबत ही नकारामत्मकताही दूर करायची असते. तेव्हा नक्की काय करावं? हे आपल्याला समजतं नाही.
तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या नात्यात दुरावा आला आहे तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या नात्यात दुरावा आलाय आणि नातं खराब होऊ लागलं आहे हे स्विकारा.
त्यानं तुमच्या मनावरील दडपण हे कमी होण्यास मदत होते. सोबत आपल्याला पार्टनरलाही हे जाणवून द्यावे. आणि त्याचसोबतच आपल्या पार्टनर हे समजावून द्या की तुम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही.
त्यातूनही आपल्यात आपल्या पार्टनरमध्ये संवाद ठेवा. कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं काढू नका.
दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पार्टनरसोबतचे सर्व हवेदावे, गैरसमज हे दूर करावेत, कारण ते केल्यानं तुम्हाला आपल्या नात्यातील दुरावा मोकळा करण्यास एक रिलिफ मिळतो.
आपल्या पार्टनरला जास्तीत जास्त स्पेस द्या. सोबतच त्याला स्वत:सोबतचा देखील वेळ द्या. आपल्या मानसिक आरोग्याकडेही प्राधान्य द्या.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)