ा जयंतीनिमित्त शिवजन्मभूमी जुन्नर येथे असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर यथासांग सोहळा पार पडला आणि पुन्हा एकदा राजाची श्रीमंती साऱ्यांनीच पा...
उपलब्ध नोंदींनुसार 10 नोव्हेंबर 1659 मध्ये साताऱ्यानजीक असणाऱ्या प्रतापगडासाठी संघर्ष झाला. मराठे आणि आदिलशाहीच्या अफजलखानामध्ये हा संघर्ष झाला होता.
28 डिसेंबर 1659 मध्ये मराठा मावळे आणि आदिलशाहीच्या सैन्यामध्ये तुंबळ लढाई झाली होती.
13 जुलै, 1660 मध्ये कोल्हापुरातील विशालगडाच्या नजीक असणाऱ्या आव्हानात्मक खिंडीमध्ये आदिलशाहीच्या सिद्दी मसुदसोबत मराठ्यांच्या दलानं लढा दिला. यामध्ये वीर मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे धारातीर्थी पडले होते.
छत्रपतींच्या नेतृत्वाखाली मराठे आणि मुघल साम्राज्यामध्ये ही लढाई 1660 मध्ये लढली गेली.
2 फेब्रुवारी 1661 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्त्वाखाली मुघलांच्या करतलब खान याच्याशी मराठ्यांनी झुंज दिली.
5 जानेवारी 1664 मध्ये गुजरातच्या सुरतमध्ये शिवबांच्या मावळ्यांनी मुघल साम्राज्यातील इनायत खानच्या सैन्याशी लढा दिला होता.
1665 मध्ये मुघलांसोबत मराठ्यांची ही पुरंदरची लढाई पार पडली.
4 फेब्रुवारी 1670 मध्ये पुण्यातील सिंहगडासाची झुंज देण्यात आली. यामध्ये महाराजांच्या आशीर्वादानं मराठ्यांचं नेतृत्त्वं सुभेदार तानाजी मालुसरे यांनी केलं होतं. जिथं त्यांनी उदयभान राठोडला तगडी झुंज दिली होती.
1682 ते 1683 दरम्यान मुघल साम्राज्याच्या बहादुर खानानं मराठ्यांना नमवत कल्याणवर ताबा मिळवला होता.
1679 मधील या युद्धामध्येही मराठ्यांना मुघलांनी पराभूत केलं होतं.
1679 मधील संगमनेरच्या लढाईमध्ये मराठ्यांसमोर मुघल उभे ठाकले होते. उपलब्ध माहितीनुसार हे छत्रपती शिवरायांच्या कार्यकाळातील अखेरचं युद्ध ठरलं.