ure : गेल्या 17 वर्षात आरसीबीला एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकता आली नाही. ...
पार्थिव पटेलने आरसीबीकडून खेळताना आयपीएल गाजवली आहे. 2014 आणि 2018 मध्ये आरसीबीने त्याला संघात घेतलं होतं.
अशातच आता पार्थिव पटेलने आयसीबी आयपीएल का जिंकत नाही? याचं कारण सांगितलं आहे. त्यावेळी त्याने विराट अँड कंपनीला चूक दाखवून दिली.
मी स्वत: आरसीबीसोबत खेळलो आहे. पण या संघाने नेहमी व्यक्तीगत खेळावर भर दिलाय, असा खुलासा पार्थिव पटेलने केला आहे.
नेहमी विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांच्यावरच टीमचं लक्ष राहिलंय, असं पार्थिव पटेलने म्हटलं आहे.
आरसीबी संघात टीम कल्चर नावाची गोष्टच नाही. मी असताना देखील नव्हती, त्यामुळेच आरसीबीला एकही ट्रॉफी जिंकता आली नाही, असं पार्थिव पटेलने म्हटलं आहे.