क्रमणं थोपवून धरण्यापासून ऋतूचक्राच्या माऱ्यालाही परतवून लावत अभेद्य उभ्या असणाऱ्या राज्यातील अशाच काही गडकिल्ल...
जाणून आश्चर्य वाटेल पण, हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी आहे. या सागरी किल्ल्यावर काही पळवाटा, एक मशीद आणि एक टाकं आहे.
दौलताबादचा किल्ला त्याच्या रचनेसाठी ओळखला जातो. शत्रूला गडावर चाल करताच येऊ नये अशी या किल्ल्याची बांधणी करण्यात आली होती. संपूर्ण दगडी बांधकाम असणाऱ्या या किल्ल्यावर येण्यासाठी 750 पायऱ्या चढाव्या लागतात.
हा सिंधुदुर्गातील एक सर्वात जुना किल्ला असून, कोकण किनारपट्टीवरील हा एक अद्भूत किल्ला ठरतो. राजा भोज दुसरा यांच्या कालखंडात या किल्ल्याची निर्मिती करण्यात आल्याचे संदर्भ आढळतात. मराठा साम्राज्यातील जहाजांचं तळ इथंच ठोकलेलं होतं असं म्हटलं जातं.
असं म्हणतात की, पुण्याताली पुरंदर किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुलाचा म्हणजेच छत्रपची संभाजीराजेंचा जन्म झाला होता. या गडाला बालेकिल्ला आणि दिल्ली दरवाजा असे दोन भाग आहेत.
पुण्यापासून 30 किमी अंतरावर असणाऱ्या मल्हारगडाचं नाव हिंदू देवदेवतांवरून ठेवण्यात आलं आहे. या गडावर पोहोचण्यासाठी सोनोरी गावातून जाणारी वाट धरावी लागते. या गडाच्या तटबंदी आणि बाह्यभाग शाबूत असला तरीही अंतर्भागाचं मात्र मोठं नुकसान झालं आहे.
स्वराज्यातील आणखी एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे प्रतापगड. तुम्हाला माहितीये का, हा गड दोन किल्ल्यांपासून तयार झाला आहे. ज्याचा एक भाग गडाचा माथा असून, दुसरा भाग दक्षिण पूर्वेकडे आहे.
पुण्यापासून काही अंतरावरच तुंग किल्ला आदिल शाहनं साधारण इसवी सन 1600 मध्ये बांधला होता. टोकदार सुळका आणि काहीसा अंडाकृती आकाराचा हा तुंग किल्ला अनेक ट्रेकर्सच्या आवडीचा.
राजगड, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मुरुंबादेवी डोंगरावर हा गड उभा आहे. ही स्वराज्याची सर्वात पहिली राजधानी. असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी, सई राणीसाहेब यांनी त्यांच्या आयुष्यातील अखेरचे दिवस इथं व्यतीत केले होते.