ptaincy Record: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आजपासून सुरु होत असलेल्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमधील पहिल्या 2 सामन्यांमध्ये नेतृत्...
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आज 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे.
पंजाबमधील मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारताचं नेतृत्व के. एल. राहुल करणार आहे.
के. एल. राहुलने आशिया चषकामधून दमदार पुनरागमन केलं. त्यामुळे आता तो नेतृत्व कसं करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून तो 9 महिन्यांनंतर ही जबाबदारी पुन्हा एकदा खांद्यावर घेतोय.
के. एल. राहुलने आतापर्यंत 7 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे.
पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत भारताचं नेतृत्व के. एल. राहुलने केलं होतं.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे तिन्ही सामने भारताने गमावले होते. त्यावेळी के. एल. राहुलच्या नेतृत्वावर टीका झालेली.
त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये के. एल. राहुलने नेतृत्व केलेलं. ही मालिका भारताने 3-0 ने जिंकलेली.
मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये के. एल. राहुलने बंगलादेशविरुद्धच्या एका सामन्यात भारताचं नेतृत्व केलेलं. भारताने के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली बांगलादेशविरुद्ध खेळलेला सामना जिंकला होता.
के. एल. राहुल कर्णधार असताना खेळवण्यात आलेल्या सर्व सामन्यांबद्दल बोलायचं झाल्यास 7 सामन्यांपैकी 3 सामने भारताने गमावले आहेत तर 4 सामने जिंकले आहे.
म्हणजेच कर्णधार म्हणून के. एल. राहुलची विजयाची सरासरी 50 टक्क्यांहून अधिक आहे.
के. एल. राहुलने आतापर्यंत तुलनेनं दुबळ्या संघांविरोधातच दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध कशी कामगिरी करतो हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.