strong>आंबा हा उष्णतावर्धक आहे,गरमीच्या दिवसात अतिरिक्त आंबा खाल्याने चेहऱ्यावर फोड येणं यांसारख्या समस्या उद्भवतात. म्हणूनच आंबा खात...
उन्हाळ्याच्या दिवसात कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात आमरस, कैरीचं पन्ह आणि आंबापोळी प्रामुख्याने खाल्ले जातात. चवीला गोड असणारा आंबा खाणं त्वचेसाठी आरोग्यवर्धक मानलं जातं.
आंब्यामध्ये अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असल्याने त्वचेसाठी फायदेशीर मानलं जातं. या पोषक घटकांमुळे चेहरा टवटवीत राहतो तसंच सुरकुत्या येण्याचं प्रमाणंही कमी होतं.
आंब्यामध्ये व्हिटॅमिन 'ए'ची मात्रा अधिक असते त्यामुळे त्वचेप्रमाणेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी आंबा गुणकारी मानला जातो.मात्र प्रमाणापेक्षा जास्त खाल्याने त्याचे चेहऱ्यावर दुष्परिणाम सुद्धा होतात.
आंब्यात साखरेचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे डायबिटीसच्या पेशंटने आंबा प्रमाणातच खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.
आंब्यात साखरेचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे डायबिटीसच्या पेशंटने आंबा प्रमाणातच खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.
आंबे खाण्यापूर्वी ते काही वेळ थंड पाण्यात ठेवावेत. स्वच्छ धुतल्याशिवाय आंबा खाऊ नये.
तसंच रात्री आंबा खाणं टाळावं, त्यामुळे उष्णतेचा त्रास होत नाही. उन्हाळ्यात अनेकांना उष्णतेचा त्रास जाणवतो. आंबा गरम असतो म्हणूनच रात्री खाऊ नये. असं डॉक्टरांकडून सांगण्यात येतं.
बीटा-कॅरोटीन, कॅरोटीनोइड्स, फ्लेव्होनॉइड्स, व्हिटॅमिन सी ,मॅंगीफेरिन आणि कोलेजन हे पोषक घटक आंब्यात जास्त प्रमाणात असल्याने नैसर्गिकरीत्या टॅन काढण्यासाठी याचा फायदा होतो. आंब्याच्या सालीचा फेसपॅक लावल्याने त्वचा नितळ होण्यासाठी मदत होते.