: भारताने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात...
टीम इंडियाने 17 वर्षानंतर टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पुन्हा एकदा इतिहास रचलाय.
टीम इंडियावर सध्या कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. अशातच आता अनेक दिग्गजांच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
टीम इंडियाचा संभाव्य भावी कोच गौतम गंभीरने एक शब्दाचं ट्विट करत टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या.
चॅम्पियन्स (CHAMPIONS) असं लिहित गंभीरने एका शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर गंभीरने भारताचा झेंडा देखील ट्विट केलाय.
टीम इंडियाच्या प्रशिक्षपदाचा माळ गळ्यात पडल्यानंतर गौतम गंभीर टीम इंडियाची कमान सांभाळेल. याची अधिकृत घोषणा लवकर होईल.