t : हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार कंगना रणौत केलेल्या वक्तव्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्याचं पहायला मिळालं होतं. कंगना...
कंगनाच्या वक्तव्यानंतर भाजपने थेट पत्रकच काढलं. पक्षाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर विधाने करण्याची परवानगी कंगनाला नाही, असं भाजपने स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यावर आता चिराग पासवान यांनी आपलं मत माडलं आहे.
कंगनाचे स्वतःचे विचार आहेत आणि ती व्यक्त करण्यास कधीही संकोच करत नाही. त्यांच्या विचाराशी कोणीही नक्कीच सहमत किंवा असहमत असू शकते, असं चिराग पासवान यांनी म्हटलं आहे.
आता राजकारणाच्या दुनियेत असताना त्यांनी विचार करायला हवा. पण, मी यात हस्तक्षेप करणार नाही. हा भारतीय जनता पक्षाचा स्वतःचा विषय आहे, असंही चिराग पासवान यांनी म्हटलं आहे.
कंगना नक्कीच माझी चांगली मैत्रीण आहे आणि मला विश्वास आहे की ती एक मजबूत इच्छाशक्ती असलेली महिला देखील आहे, असं म्हणच चिराग पासवानने कंगनाचं कौतूक देखील केलंय.
दरम्यान, जर आमचे नेतृत्व मजबूत नसतं तर शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबचे बांगलादेशात रूपांतर झालं असतं. केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने कृषी विधेयक मागे घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला होता असा दावाही कंगनाने केला होता.