मुंबईला मायानगरी म्हटलं जातं. या मायानगरीत येऊन बॉलीवूडचे अनेक कालाकार सुरुवातीच्या काळात चाळीत राहिले होते.
...सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास अनेकांना उत्सुकता असते.
एका मुलाखतीत जॅकी श्रॉफने सांगितलं की, करियर होई पर्यंत ते चाळीतल्या घरात राहत होते.
अभिनेता अनुपम खेर हे त्यांच्या करियरच्या सुरुवातीच्या काळात चाळीतल्या घरात राहत होते.
मुंबईतील हाय क्लास, सोसायटीत राहणारे मनोज बाजपेयी हे सुरुवातीच्या दिवसात चाळीत 10 जणांसोबत एकत्र राहत होते.
बॉलीवूडचा विनोदी अभिनेता अर्शद वारसी मध्यमवर्गीय कुटुंबातील होता. अर्शद त्याच्या कुटुंबासोबत मुंबईतल्या चाळीत राहत होता.
विनोदी अभिनेते जॉनी लिवर यांचं बालपण मुंबईतल्या चाळीत गेलं असल्याने त्यांना मराठी खूप छान बोलता येतं.
आपल्या हटके डान्स शैलीने ओळखला जाणारा गोविंदा हा चाळीत राहत होता. विरारचा हा छोरा उत्तम मराठी बोलतो.
बॉलीवूडच्या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शक मधुर भांडारकर हे देखील मुंबईत चाळीत राहत होते.