PHOTOS

काडीमोड होऊन इतक्या वर्षानंतरही 'या' अभिनेत्रींनी का घेतले नाहीत सातफेरे?

रावे आणि घर पाहावं बांधून' त्याशिवाय जीवनाचा अर्थ कळत नाही. तसेच आणखी एक म्हण आहे, 'शादी का लड्डू जो खाए वो पछताए जो ना खाए वो भी पछताए...

Advertisement
1/5

1.पूजा भट्ट : अभिनेत्री पूजा आजकाल बिग बॉस ओटीटी 2 चा भाग आहे. ती शोमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलत आहे.  या अभिनेत्रीने 2003 मध्ये 24 ऑगस्ट रोजी लग्न केले होते. तिचे लग्न मनीष नावाच्या व्यक्तीशी झाले होते. पूजाचे पती हे मीडिया जगतात नावाजलेले व्यक्ती आहेत. दोघांमधील प्रेम संपुष्टात आल्याने त्यांचे लग्न 11 वर्षांनंतर मोडले.

2/5

2. सुजैन खान : सुझैन खान हिने 20 डिसेंबर 2000 रोजी अभिनेता हृतिक रोशन याच्याशी लग्न केले. त्यांचे लग्न 14 वर्षे टिकले आणि 1 नोव्हेंबर 2014 रोजी दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आज सुझैन खान आणि हृतिक रोशन त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. मात्र, त्यांची मैत्री दिसून येत आहे.

3/5

3. अमृता सिंग : अभिनेत्री अमृता सिंग हिने 1991 मध्ये सैफ अली खलसोबत लग्न केले. या दोघांची जोडी 90 च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध जोडी होती, परंतु कौटुंबिक कलहामुळे दोघांनी 2004 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सैफ याने करीना कपूरसोबत दुसरे लग्न केले, पण अमृता अजूनही सिंगल आहे.

4/5

4. कल्की कोचलिन : कल्की कोचलिन हिने अनुराग कश्यपला अनेक वर्षे डेट केले आणि दोघांनी 2011 मध्ये लग्न केले, परंतु त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि 2013 मध्ये ते वेगळे झाले. 

5/5

5. करिश्मा कपूर : करिश्मा कपूर 90 च्या दशकातील सर्वात हिट हिरोईनपैकी एक होती. तिने 2003 मध्ये संजय कपूरसोबत लग्न केले. मात्र हे लग्नही इतरांप्रमाणे मतभेद आणि आरोपांमुळे संपुष्टात आले. 2014 मध्ये दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. ती आता सिंगल राहत आहे.





Read More