PM Modi showered flowers on the worker: अयोध्येच्या नव्याने बांधलेल्या राम मंदिरात राम लल्लाचा अभिषेक सोहळा पार पडला. 500 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर रामभक्तांना हा क्षण पाहता आला.
प्रभू श्रीराम आणि जटायूचे खास नाते होते. त्यामुळे जटायूची खास मुर्ती येथे बनविण्यात आली आहे. पंतप्रधानांनी या मुर्तीचे अनावरण केले.
यावेळी पंतप्रधान मोदींनी राम मंदिर बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी केली.
पंतप्रधान मोदींनी या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करुन आभार मानले.
मंदिर निर्माणाचे कार्य करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र एक करत काम केले.
ज्या हातांनी राम मंदिर बनवले त्या हातांना कधी विसरता येणार नाही.
मंदिराबद्दल बोलले जाईल तेव्हा मंदिर बनवणाऱ्यांची आठवण काढली जाईल.
रामायणात जटायू, वानरसेनेने श्रीरामाला सहाय्य केले, त्याप्रमाणे मंदिर निर्माणात या कामागारांनी मोलाचा वाटा उचलला.