Marathi News> मुंबई
Advertisement

राज्यात आज कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ, प्रशासनाच्या चिंता वाढल्या

राज्यात पुन्हा एकदा रुग्णांची मोठी वाढ

राज्यात आज कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ, प्रशासनाच्या चिंता वाढल्या

मुंबई :  राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. आज कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यात आज 5427 नवे रुग्ण वाढले आहेत. तर 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात 2543 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची वाढ कमी होत होती. पण आता कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्य़ाने राज्यातील प्रशासन चिंतेत आहे. 

सध्या राज्यात 2,16,908 व्यक्ती होमक्वांरटाईन असून 1743 लोकं संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.48 टक्के इतका आहे. तर रिकव्हरी रेट 95.5 टक्के झाला आहे.

राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 20,81,520 झाली आहे. तर 40,858 रुग्ण अजूनही राज्यात एक्टीव्ह आहेत. 

Read More