Marathi News> मुंबई
Advertisement

फोनवर बोलणं पुन्हा महागणार...'या' कंपन्यांचे प्लान्स बदलणार

तुम्हीही 'या' कंपन्यांचे यूझर असाल तर तुम्हालाही मोठा झटका बसेल.

फोनवर बोलणं पुन्हा महागणार...'या' कंपन्यांचे प्लान्स बदलणार

मुंबईः सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत असताना आता आणखी एक झटका बसणार आहे. खासगी टेलिकॉम कंपन्या आता प्रीपेड प्लान्स वाढवणार असून त्यामुळे आता मोबाईलवर बोलणंही महागणार आहे.

भारतातील खासगी टेलिकॉम कंपन्या दिवाळीपर्यंत प्रीपेड टॅरिफ प्लान्स 10% ते 12% वाढवू शकतात. ही दरवाढ ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2022 पर्यंत होऊ शकते.

fallbacks

या खासगी टेलिकॉम कंपन्यांमध्ये Airtel, Jio आणि Vi या कंपन्यांचा समावेश आहे.  त्यामुळे तुम्हीही या कंपन्यांचे यूझर असाल तर तुम्हालाही मोठा झटका बसेल.

fallbacks

तज्ज्ञांकडून असं बोललं जात आहे की, टेलीकॉम कंपन्या प्रीपेड प्लान्समध्ये आणखी 10%-12% दरवाढ करतील.

fallbacks

भारती एअरटेल, जिओ आणि Vi चे एवरेज रेवेन्यू पर यूजर ( ARPU) अनुक्रमे रु. 200, रु. 185 आणि रु. 135 पर्यंत वाढवू शकतात.

Read More