मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी राज्य सरकारमधल्या नेत्यांची आणि मंत्र्यांचीही सीबीआयकडून चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. या मागणीचं पत्र अतुल भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलं आहे. राज्यातील मंत्र्यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोपही भातखळकर यांनी केला आहे.
आदरणीय गृहमंत्री
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 30, 2020
अमित शाह जी
केवल रिया चक्रवर्ती और उनके दोस्तो की जांच काफी नही, इस केस को उलझाने वाला राज्य का गृहमंत्रालय और पुलिस पर दबाव बनाने वाले नेता (या मंत्री?) की भी CBI द्वारा जांच हो। तभी सुशांत केस की सच्चाई सामने आयेगी। @AmitShah pic.twitter.com/HusdCIEwoc
मा. गृहमंत्री
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 30, 2020
अमित शाह जी...
बॉलीवूड, ड्रग्स और पॉलिटिक्स का जहरीला गठजोड सामने न आये इस के लिये पुरजोर प्रयास करने वाले राज्य सरकार में शामिल नेताओ का भी भांडाफोड करे CBI. @AmitShah pic.twitter.com/6G6gCHk3OB
बॉलीवूड, ड्रग्ज आणि राजकारणी यांचि विषारी युती समोर येऊ नये, यासाठी प्रयत्न करणाऱ्या राज्य सरकारमधल्या नेत्यांचाही सीबीआयने भांडाफोड केला पाहिजे. फक्त रिया चक्रवर्ती आणि तिच्या मित्रांची चौकशी पुरेशी नाही, तर केसमध्ये गुंतागुंत वाढवणारं राज्याचं गृहमंत्रालय आणि पोलिसांवर दबाव टाकणारा नेता (मंत्री?) यांचीही सीबीआयकडून चौकशी व्हावी, तरंच सत्य समोर येईल, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.