Marathi News> मुंबई
Advertisement

आंदोलनामुळे रडकुंडीला आलेल्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

आज रेल्वे प्रशिक्षणार्थींनी मध्ये रेल्वे मार्गावर केलेल्या आंदोलनामुळे दहावी - बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी मात्र रडकुंडीला आले... या विद्यार्थ्यांना प्रशासनानं दिलासा दिलाय. 

आंदोलनामुळे रडकुंडीला आलेल्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई : आज रेल्वे प्रशिक्षणार्थींनी मध्ये रेल्वे मार्गावर केलेल्या आंदोलनामुळे दहावी - बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी मात्र रडकुंडीला आले... या विद्यार्थ्यांना प्रशासनानं दिलासा दिलाय. 

सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या कारणाने परीक्षा केंद्रास उशीर झाला तरी त्या विद्यार्थ्यांना एक तास उशीरापर्यंत परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात यावा तसंच उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना तितकाच वेळ वाढवून देण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. 

तसंच दुपारी २.०० वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा केंद्रात येण्यास उशीर झाला तरी त्यांनाही एक तास उशीरापर्यंत परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात यावा, आणि वेळही वाढवून देण्यात यावा, असे आदेश मुंबई विद्यापीठानं दिले आहेत. 

Read More