Marathi News> मुंबई
Advertisement

कोंढवा दुर्घटनेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

कोंढवा या ठिकाणी भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्यमंत्री यांनी सखोल चौकशीचे आदेश दिलेत.  

कोंढवा दुर्घटनेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : पुण्यातील कोंढवा या ठिकाणी भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे कोंढवा भागात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला, ही अत्यंत दु:खद घटना आहे. मी या सगळ्यांच्या दुःखात सहभागी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.

कोंढवा दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेच्या घटनेबाबत सखोल चौकशीचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, आल्कन स्टायलस या सोसायटीच्या बाजूला असलेल्या इमारतीचे बांधकाम थांबवण्याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. महापौरांनी मजुरांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत जखमींची विचारपूसही केली.

कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला. पहाटे दोनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून मदतकार्य सुरूय. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. पुण्यातल्या बडा तालाब मस्जिद भागात आल्कन स्टायलस सोसायटीच्या संरक्षक भिंतीला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या. त्यावर भिंत कोसळली.

Read More