Marathi News> मुंबई
Advertisement

आमचा संजय दिल्लीत तर त्यांचा 'जय' घरी, या मंत्र्याने केला दावा

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही संजय विजयी होतील तर, भाजपचे ते 'जय' घरी जातील असा दावा शिवसेनेच्या या मंत्र्याने केला आहे.

आमचा संजय दिल्लीत तर त्यांचा 'जय' घरी, या मंत्र्याने केला दावा

मुंबई : शिवसेनेचे संजय राऊत आणि संजय पवार हे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील यात काही शंका नाही. महाविकास आघाडी सरकारमधील सर्व घटक पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे आमचे चारही उमेदवार विजय होणार असे राज्यमंत्री अब्दुल सत्तर यांनी सांगितले.

सायंकाळी निकाल लागेल तेव्हा आम्ही गुलाल उधळणार आहोत. उमेदवाराला जिकंण्यासाठी जो कोटा आहे त्यापेक्षा एकेक मत जास्त घेऊन ती विजयी होतील असे सत्तर म्हणाले.

राज्यसभेत एक उमेदवार जादा देऊन भाजपने जो खेळ खेळला त्याला धडा शिकवण्याचे काम आघाडी करणार आहे. त्यामुळे आमचा संजय दिल्लीत जाणार तर त्यांचा 'जय' घरी जाणार असे त्यांनी सांगितले. 
  
बहुजन आघाडीचे ठाकूर, त्यांची मुले आमच्यासोबत आहेत. त्यांनी रात्रीच आम्हाला तसे सांगितले आहे. तसेच, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा आमदार संतोष दानवे हे माझ्यासोबत आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.  

Read More