Marathi News> मुंबई
Advertisement

ढगाळ वातावरणामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा

मे महिन्यात अशाप्रकारे ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं मुंबईकरांना हायस वाटलं असून घामाच्या धारांपासून त्यांची सुटका झालीय.

ढगाळ वातावरणामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा

मुंबई: उकाड्यापासून आणि घामाच्या धारांपासून मुंबईकरांना आज (बुधवार, २३ मे) दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. मुंबईत आज ढगाळ वातावरण निर्माण झालंय. मुंबईत काही ठिकाणी तुरळक पाऊसही पडतोय. यंदा मान्सून केरळमध्ये २९ मे रोजी दाखल होणार आहे. यामुळे मान्सून महाराष्ट्रतही लवकर दाखल होणार आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात रिमझिम पाऊस पडत असून मुंबईतही ढगाळ वातावरण निर्माण झालय. मे महिन्यात अशाप्रकारे ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं मुंबईकरांना हायस वाटलं असून घामाच्या धारांपासून त्यांची सुटका झालीय.

Read More