Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबई: सिग्नल यंत्रणेतील बिगाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

 दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास घाटकोपर ते विद्याविहार स्टेशन दरम्यान जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद वाहतूक ठप्प झाली.

मुंबई: सिग्नल यंत्रणेतील बिगाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई :  मुंबईत रोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात. लोकल ट्रेन ही जीवन वाहिनी म्हणून ओळखली जाते. मात्र हीच लोकल बंद पडली की प्रवाशांचे हाल होतात. दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास घाटकोपर ते विद्याविहार स्टेशन दरम्यान जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद वाहतूक ठप्प झाली. दुरुस्तीसाठी बराच काळ लागल्याने प्रवाशांनी भर उन्हात रुळावरुन चालत जात जवळचे स्टेशन गाठलं. या बिघाडामुळे लोकलच्या एकामागोमाग रांगा लागल्या.

Read More