Marathi News> मुंबई
Advertisement

'एमपीएससी भरती रॅकेट' प्रकरणाची सरकानं घेतली दखल

नांदेडच्या योगेश जाधव या तरुणाने शासकीय सेवेतील हा भरती गैरव्यवहार २०१५ साली उघडकीस आणला होता. 

'एमपीएससी भरती रॅकेट' प्रकरणाची सरकानं घेतली दखल

मुंबई : दुसरा व्यापम गैरव्यवहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यातील 'एमपीएससी भरती रॅकेट' प्रकरणाची उशीरा का होईना राज्य सरकारने दखल घेतलीय. या प्रकरणी राज्याचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीला योगेश जाधव, सीआयडीचे प्रमुख संजय कुमार, एसआयटीचे प्रमुख शंकर केंगार आणि इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. एमपीएससीमधील या गैरव्यवहाराचा योग्य तपास व्हावा यासाठी टास्क फोर्स नियुक्त करण्यासाठी रणजीत पाटील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. 

नांदेडच्या योगेश जाधव या तरुणाने शासकीय सेवेतील हा भरती गैरव्यवहार २०१५ साली उघडकीस आणला होता. एमपीएससी भरती रॅकेटद्वारे २५ ते ३० लाख रुपये देऊन राज्याच्या शासकीय सेवेत हजारो जण दाखल झाले आहेत. 

मात्र, या गैरव्यवहाराचा तपास अगदी धीम्या गतीने सुरू आहे. हायकोर्टाने नेमलेल्या तपास पथकानेही आतापर्यंत योग्य तपास केलेला नाही. तर मुंबईतील भायखळा पोलीसांनी हे प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न केला.

Read More