Marathi News> मुंबई
Advertisement

गौरी लंकेश यांच्या हत्येमागे वैभव राऊत ?

आरोपींच्या डायऱ्यांमध्ये वैभव राऊत आणि त्याच्या साथीदारांची नावं

गौरी लंकेश यांच्या हत्येमागे वैभव राऊत ?

मुंबई: राज्यात घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या वैभव राऊत आणि त्याच्या साथीदारांच्या चौकशीत दररोज नवनवीन माहिती पुढे असताना आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. 

कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणाचे धागेदोरे शोधण्यासाठी कर्नाटक एसआयटीचे एक पथक मुंबईत दाखल झाले आहे. नालासोपाऱ्यातून अटक करण्यात आलेल्या वैभव राऊत आणि त्याच्या साथीदारांची चौकशी करण्यासाठी हे पथक मुंबईत आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीने काही आरोपींना अटक केली आहे.  त्या आरोपींच्या डायऱ्यांमध्ये वैभव राऊत आणि त्याच्या साथीदारांची नाव असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता याप्रकरणात काही धक्कादायक माहिती समोर येते का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Read More