Marathi News> मुंबई
Advertisement

पवई तलाव भरुन वाहू लागला; या तलावाबाबतची महत्त्वाची माहिती एकदा वाचाच

तलाव बांधण्यासाठी करण्यात आलेला इतका खर्च... 

पवई तलाव भरुन वाहू लागला; या तलावाबाबतची महत्त्वाची माहिती एकदा वाचाच

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई :  बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव रविवारी म्हणजेच दिनांक ०५.०७.२०२० ला पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला. 

५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते. गेल्या तीन दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

पवई तलावाबाबत महत्त्वाची माहिती संक्षिप्त स्वरुपात पुढीलप्रमाणे :

- बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा तलाव आहे.

- या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले.

- या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे १२.५९ लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.

- या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ चौरस किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते.

- या तलावाची पूर्ण भरून वाहण्याची पातळी ही १९५ फूट आहे.

 

- तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लीटर पाणी असते. (५,४५५ दशलक्ष लिटर)

- हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

Read More